पोस्ट्स

श्वासांची उलथापालथ का ?

इमेज
  श्वास...श्वास....श्वासावर लक्ष केंद्रित करा... शांतता...शांतता... श्वास घ्यायचा...श्वास सोडायचा...मनातले सगळे विचार सोडून द्या... शांतता...शांतता... अरे देवा,काय करावे...माझ्या पाठीला खाज सुटली..आता काय.. शिंक पण आताच यायची होती का ?(आक..छी SSSS....) हे कसले कसले विचार येतात ,कुणाचे काय कर्ज,कुणाची बारावी,अरे आज दहावीचा निकाल आहे...त्या पिंट्याला किती मार्क पडतील बरे ! जाऊ द्या त्याने काय चांगला अभ्यास केला नव्हता...जाऊ द्या किती ही मार्क घेऊ दे ,मला काय करायचे..... श्वास घ्या ....श्वास सोडा.... शांतता...शांतता.... अरे,मला तर आज भिशीचा हफ्ता भरायचा.. गाडी सर्विसिंग ला पण टाकायची...मग काय रिक्षाने जायचं ऑफिसला...अरे १५ मिनिट झाले असतील की आता ध्यानाला ...बघू का एकदा घड्याळाकडे... श्वास घ्या...श्वास सोडा... शांतता...शांतता... श्वासावर लक्ष केंद्रित करा...Inhale... and ..Exhale... अरे,हे काय ?ध्यानाला बसल्यावर इतके विचार.मग माझ्या  ध्यानाचा काय उपयोग होणार अशाने.मग ध्यान पाहिजे तितके प्रभाव माझ्या मनावर करणार नाही.मला माझ्या ह्या  ध्यानाने एकाग्र चित्त ,शांतता,Concentratio...

अहंकाराचा मेरू

इमेज
  एक झाड जे खूप हिरवेगार होते त्याच्या फांद्या, फळे, पानं सगळेच कसे लोभसवाणे.त्या झाडाच्या सावलीत एक मुलगा रोज खेळायचा. त्याला ते झाड खूप आवडायला लागले,त्याची पाने, फळे, फांद्या सगळे त्याचे अगदी जिवलग बनले.त्या मुलाला त्या झाडाशिवाय करमतच नव्हते. दिवसभर त्या झाडाच्या सावलीत खेळणे हा त्याचा नित्यक्रमच बनला  होता.झाड आणि मुलगा यांच्यात एक वेगळेच नाते निर्माण झाले होते.त्या लहान मुलाला ते मोठेसे झाड खूप आवडू लागले.तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. त्याचे शाळेच वर्ष संपून कॉलेज चालू झाले, मुलाचे झाडाकडे येणे पण कमी कमी होत गेले.एकेदिवशी मुलगा झाडाकडे येतो तेव्हा झाड म्हणते अरे, तू माझ्याकडे येणे आता खूप कमी केले आहेस असे का ?मुलगा म्हणतो, तुझ्याकडे आता काय आहे ? मला पैसे पाहिजे, आहेत का तुझ्याकडे ?झाड म्हणतो, पैसे आम्हा झाडांना पैसे माहित नाहीत बाळा,आम्हाला फक्त झाडाची फळे,फांद्या,आणि लाकडे एवढेच माहित आहे. तुम्हा माणसाकडे पैसे असतात. म्हणूनच  तुमच्यात अशांतता ,दुःख,चिंता आहे.जर तुला पैसेच पाहिजे असतील तर नक्कीच तू माझी ही फळे तोडून त्याचे पैसे करू शकतोस.मुलाने वेळ न दवडता पटाप...

मनाचे द्वंद्व का ?

इमेज
"हितोपदेश"  या प्राचीन भारतीय ग्रंथात मानवी मनाची तुलना एखाद्या माकडासारखी केली आहे.माकड ज्याप्रमाणे झाडावर एका फांदीवरून दुसरया फांदीवर नुसत्या उड्या मारत राहतो.त्या उड्या विनाकारणच असतात.मी माकडाला कधीही एकाच फांदीवर बसलेले पाहिले नाही,तुम्ही पाहिले आहे का ? नक्कीच नसणार आहे.माणसाच्या मनात एका दिवसाला किमान ७०,००० विचार येतात.माणसाचे मन स्थिर राहतच नाही.विज्ञानाने पण हे सिद्ध केले आहे की,प्रत्येक ३ सेकंदानंतर माणूस भूतकाळात जातो.भूतकाळात तुम्ही जे अनुभवले आहे त्यावरच तुम्ही काय होऊ शकते? काय होईल? काय होणार? काय करायला हवे? अशाप्रकारे आखाडे तयार करत असता,अनुमान बांधत असता .वर्तमानात तुमचे मन केवळ ३ सेकंदापर्यन्तच राहते.खरेतर तुमचे मन नेहमी तुमच्या सोबत नसतेच,असते  फक्त भूतकाळातील गोष्टींवर अनुमान बांधणे. जे घडत असते त्यावर तुमचा मेंदू काहीच प्रतिक्रिया करत नसतो, पुढे काय होणार आहे ह्याचेच अनुमान लावत असतो.जर तुम्ही निरीक्षण केले तर नक्कीच तुम्हाला ह्याची जाणीव होईल की,तुमचं मन किती माकड-उड्या मारते ते ! जाऊ द्या हे हसण्यासारखे नाही, मी माकड उड्या म्हणल्यानंतर तुम्हाल नक्कीच...

भौतिक गोष्टींमध्ये खरेच आनंद आणि समाधान असते का?

इमेज
  एकदा मी दक्षिण भारतातील प्रमुख तीन पवित्र मंदिरांपेकी एक असलेल्या श्रीरंगपुरमधील एका मंदिराला भेट दिली.तिथे मंदिराच्या छतावरच्या नाजूक कलाकुसरीच्या नक्षीला सोन्याचा मुलामा चढवत असलेल्या एका कामगारांशी माझी भेट झाली. मी त्याआधी असे काही काम कधीही पाहिले नव्हते, म्हणून मी ते काम बघत तिथेच उभा राहिले. पण वर नजर टाकल्यावर सोन्याची पूड माझ्या डोळ्यात उडाली .मी डोळे धुण्यासाठी मंदिरातून धावतच बाहेर पडले ,त्यानंतर पुन्हा परतल्यावर मी सुरक्षित अंतर ठेवून मी पुन्हा ते काम पाहू लागले. हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला, एखाद्या ग्रंथातील धड्याचे पान फाडून आणल्यासारखे वाटले.                        सुवर्णपूड सुंदर असते, पण तिच्या फार जवळ गेले तर ती तुमची नजर अंधुक बनवते.मंदिरांना दिला जाणारा मुलामा हे प्रत्यक्ष घनरूप सोनं नसतं, ती एका द्रावणात मिसळलेली सुवर्णपुड असते.ती एक माया असते,दगडांना झाकून टाकून ते एक घनरूप सोनच आहे असे आपल्याला वाटावे,यासाठी दगडांना सोन्याचा मुलामा दिला जातो.तो एक आभास असतो,त्याप्रमाणेच पैसा आणि प्रसिद्ध...

तुमच्या अंतर्मनातील अदृश्य कलात्मकता

इमेज
एक दंतकथा सांगते की,एक महिला पिकासोला बाजारात पाहते आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणते की, पिकासोजी माझ्यासाठी एक  चित्र तयार करून द्याल का ? त्यावर पिकासो तयार होतो आणि त्याने अवघ्या ३० सेकंदात एक सुन्दरसे चित्र  त्या महिलेच्या हातात ठेवतो आणि सांगतो ह्या चित्राची  किमंत ३० हजार डॉलर आहे.त्या महिलेला आश्चर्य वाटते ती म्हणते तुम्ही तर केवळ ३० सेकंदात हे चित्र तयार केले आणि एवढी मोठी किमंत माझ्याकडून कशी काय वसूल करू शकता ? त्यावर पिकासो म्हणतो,मला ह्यासाठी ३० वर्ष घालावी लागली आहेत. त्यामुळेच मी ३० सेकंदात अशी कलाकृती तयार करू शकलो. आपल्याला कोणत्याही गोष्टी मागच्या परिश्रमाचे मोल वाटत नाही,सातत्याने तुम्ही त्यावर काम करायला हवे तर त्यात तुम्ही प्रवीण होऊ शकता,तुम्ही त्यात मास्टर होऊ शकता.आपल्या सर्वांकडेच अंतर्यामी एक अशी बुद्धिमत्ता असते. तिथपर्यंत आपण पोहचतच नाही.कारण ती अदृश्य असते ती अदृश्य कलात्मकता आपल्या थेट दिसणाऱ्या दृश्य  मार्गावर  नसते.जो त्या अदृश्य कलात्मकतेला आपलेसे करतो त्याला जीवनाचे पूर्ण समाधान,अर्थपूर्णता,आणि सर्वकाही मिळते. तुम्हाला पण तुमच्या अदृश...

मुलांकडून अवास्तव अपेक्षा का ?

इमेज
" ऐक ना बाळा,तू झोपेत आहेस पण मला काहीतरी सांगायचे आहे तुला.तुझ्या खोलीत मी आघाशासारखा  शिरलोय,तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालावर लाळेचे ओघळ येताहेत कपाळावर  तुझ्या कुरळ्या  केसांची बट हलतेय ,एक गाल डाव्या  हाताखाली दबलेला आहे.पाय एकमेकावर टेकलेले आहेत डावा पाय थोडासा वाकडा झाला होता मी तो सरळ केला.तू एक निवांत आत्मा वाटत आहेस . मी शर्मेल्या नजरेने तुझ्याकडे पाहत आहे. जेव्हा काल सायंकाळी मी माझ्या खोलीत कसल्या तरी (पुस्तक वगेरे वाचणे ) कामात व्यस्त होतो,  तेव्हा तू  माझ्याजवळ येऊन हळूच लडीवाळपणे मला मिठी मारत होतास,तुला काहीतरी सांगायचे होते. पण मी माझ्याच धुंदीत होतो. मला तुझा तो लडिवाळपणा कळला नाही मला माफ कर.आणि हो त्या दिवशी मी ऑफिसला जात असताना तू मला काहीतरी तुझ्या मित्राची गमंत सांगत होतास,पण मी तोंड वाकडे करून तुझ्यावर डोळे वटारून तुला काही बोलूच दिले नाही किंवा तू काय म्हणत होतास ते ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता. कारण मला ऑफिसला जायला वेळ होत होता. किती रे वाईट मी .मी माझ्याच कृतीवर आज शरमिंदा झालोय मी इतका  वाईट   कसा झालोय.तू एक प्रेमळ निर्...

Inner Balance काय असते

इमेज
          क्लेब्यं मा स्म गमः पार्थ नेतृत्त्तव्य्युपपद्धते/           क्षुद्रम  दद्द्य्दौर्ब्ल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप//  असे  भगवद्गीतेच्या  दुसऱ्या अध्यायात म्हटले आहे.याचा अर्थ आहे की,अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, हे भगवान या युद्धभूमीवर माझ्यासोबत लढायला कोण कोण आले आहेत हे मला पाहायचे आहे. तेव्हा माझा हा रथ  युद्धभूमी च्या मधोमध  घेऊन चला, जेणेकरून मला माझे  विरोधी सगळे स्पष्टपणे  दिसतील. तेव्हा सारथी असलेल्या  श्रीकृष्णाने रथाला युद्धभूमीवर मधोमध  घेऊन जातात. तर अर्जुनाला त्याच्यासमोर युद्धभूमीवर सगळे त्याचे आप्तेष्ट दिसतात. तेव्हा अर्जुनासारखा सर्वोत्कृष्ट  धनुर्धारी घायाळ होतो, व्याकूळ होतो, भावनावश होतो आणि रडायला लागतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना (क्लेब्यम)असा नपुसंकासारखा करू नकोस तुझ्यासारख्या सर्वोत्कृष्ट क्षत्रियाला हे  शोभत नाही.हे अर्जुना, तू युद्धभूमीवर आहेस तुझ्या समोर जे कोणी असतील ते सगळे आता तुझे शत्रू आहेत. तू लढ.तू  अस...