पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अपयशातूनच यशाकडे झेप

इमेज
      एक हजार वेळा प्रयोग केल्यानंतर बल्बचा शोध लावण्यात थॉमस अल्वा एडीसन यशस्वी होतो. त्याचे एक यशच लोकांच्या डोळ्यांना दिसते, परंतु एक हजार वेळेस त्याला अपयश पत्करावे लागले  ह्याचा विचार केला जात नाही. एक हजार वेळा एडीसन प्रयोगशाळेत बसून आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रयोग करत होता. प्रत्येकवेळा येणाऱ्या अपयशाने एडीसन जराही खचला नव्हता. त्याची प्रत्येक सकाळ ही प्रफुल्लीत, प्रसन्न, आणि यशानेच  भरलेली होती. लोकांनाही आश्चर्य वाटत होते की, हा इतक्या वेळा मिळालेल्या अपयशाने खचून कसा काय जात नाही. ह्याची प्रत्येक सकाळ ही परत त्याच सकारात्मकतेने भरलेली, परत तीच उत्सुकता. हे कसे काय शक्य आहे. एखाद्या साधारण व्यक्तीच्या समजण्यापलीकडची ही गोष्ट होती. एडिसन हा एक यशस्वी व्यक्ती म्हणून आपण त्याचे कौतुक करतो. परंतु ह्या अपयशातूनच त्याने यशाकडे झेप घेतली होती.  जेव्हा तुम्हाला वारंवार अपयशाला सामोरे जावे लागते तेव्हा यशासाठी संयम ठेवावाच लागतो.  तुम्हालाही वारंवार अशा अपयशालाच सामोरे जावे लागत आहे का ? तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही तुमची झेप ही यशाकडे जात नाही का ? तर...

तुमच्यात सकारात्मकता कशी वाढवायची ?

इमेज
    एक खूप मोठी पहाडी होती त्या पहाडीवर एक व्यक्ती दररोज फिरायला जात असे. त्याचा लहान मुलगा एके दिवशी त्याच्या मागे लागला आणि सोबत येण्यासाठी हट्ट धरू लागला. म्हणून त्या माणसाने त्याच्या त्या लहान मुलालाही त्या दिवशी सोबत घेतले. त्या पहाडीवर खूप दगड होते आणि पायवाट पण खूप अरुंद अशीच होती. त्या पहाडीवर गेल्यास तो मुलगा एका दगडाला ठेसाळून खाली पडला आणि जोरात ओरडला. पहाडी असल्यामुळे त्या मुलाचा आवाज पूर्ण पहाडीमध्ये घुमू लागला. ही गोष्ट त्या लहान मुलासाठी नवीनच होती. तो घाबरला आणि त्याने त्याच्या वडिलांना विचारले हा कोण आहे जो मला असा चिडवत आहे मी जसा ओरडेल तसेच ओरडत आहे. बराच वेळपासून वडील त्याचे सर्वकाही ऐकून घेत होते. मग वडिलांनी जोरात ओरडले, 'तू मला खूप खूप आवडतोस, तू खूप खूप चांगला आहेस.' असे म्हणल्यास त्या मुलाला आश्चर्य वाटते की, माझे बाबा तो कोण आहे जो मला चिडवत आहे त्यालाच म्हणत आहेत की, तू खूप चांगला आहेस, ही काय भानगड आहे. वडिलांना तो मुलगा विचारतो तेव्हा वडील म्हणतात बाळा आपण जसे बोलतो जसे वागतो आणि जसे शब्द उच्चारतो त्याप्रमाणेच समोरच्याकडूनही आपल्याला अभिप्राय मिळत ...

तुमच्यात स्वयंशिस्त आहे का ?

इमेज
         एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीकडे बोलावणे आले, तेव्हा दिल्लीला जाण्यासाठी आणि तेथील सर्व कारभार निपटून परत येण्यासाठी त्यांना बराच मोठा कालावधी लागणार होता. मग एवढ्या मोठ्या कालावधीसाठी राज्यातील कारभार कसा सुरळीत चालणार हा त्यांना प्रश्न पडला. ह्यासाठी त्यांनी आपल्या किल्ल्यातील सैनिकांची परीक्षा घ्यायचे ठरवले आणि एका किल्ल्याच्या गेटवर एकदम मध्यरात्री गेले.  तत्पूर्वी त्यांनी सायंकाळनंतर किल्ल्याचे गेट बंद करणे, असा नियम त्यांनी पाडला होता. किल्ल्याच्या दरवाज्याला राजे अत्यंत मध्यरात्री आले तेव्हा किल्ल्याचा दरवाजा बंदच होता. दरवाज्यावरील पहारेकरयास राजेंनी दरवाजा काढायला सांगितले पण दरवाज्यावरील पहारेकऱ्याने काही दरवाजा काढला नाही. पहारेकरी म्हणाला की, "माफ करा राजे, आता सायंकाळनंतर मी दरवाजा काढू शकत नाही. आपण मांसाहेबांची परवानगीचे पत्र आणावे, म्हणजे मी दरवाजा काढू शकतो राजे. अन्यथा मी दरवाजा काढू शकत नाही मला माफी असावी. हा दरवाजा आता मी सकाळी सूर्य उगवतीलाच काढू शकेन." आणि ह्या पहारेकरयाच्या बोलण्यामुळे राजे आपले बाहेरच थांबले आणि सका...

झोप म्हणजेच अखंड ध्यानाची यात्रा

इमेज
  मेध्यानाडीमन संयोगात्त देहेन्द्रीयानाम सूखयोगः म्हणजेच झोप ही मध्यनाडी आणि मन ह्यांच्या संयोगाने सुखयोग होय.  झोप ही तुमच्या आरोग्यासाठी आणि मनासाठी खूप गरजेची आहे. आपल्या झोपेच्या पाच अवस्था असतात. ह्या अवस्थांना एकूण ९० ते १२० मिनिटांचा वेळ लागतो. म्हणूनच आयुर्वेदात म्हणले आहे की, मानवी शरीराला केवळ दोन तासांची झोप पुरेशी असते. काही जणांच्या झोप ही  ताब्यात नसते किंवा झोप लागत नाही, झोप पुरेशी होत नाही, दुपारी झोपले तर रात्री झोप येत नाही. अशा समस्या तुम्हाला असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.  माझा ह्या ब्लॉगचा पहिला भाग जर तुम्ही वाचला नसेल तर पहिल्या भागाची लिंक इथे देते तो तुम्ही वाचून घ्या.  https://mayaolympicsgames.blogspot.com/2021/05/blog-post_11.html ग्रँडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स म्हणते की, “When I don’t get enough sleep, I just can’t get a good workout. It’s low-quality and I don’t have enough rejuvenation in my cells to use the muscles that I need to use.” ६)जेवण केल्यास लगेच झोपू नका :     जेवण केल्यास लगेच झोपु नये कारण प...

झोप म्हणजेच अखंड ध्यानाची यात्रा

इमेज
  "बंड्या ऊठ झोपतोस काय लेका, अरे, सूर्य पार माथ्यावर चमकायला लागला. तरीबी तुझा डोळा उघडत नाही. काय म्हणावे तुझ्या ह्या झोपेला." अशी वाक्य नेहमी आपण ऐकतो किंवा मग तुम्ही दररोज सकाळी तुमच्या घरातच अशी वाक्ये वापरत असाल. ह्या पूर्ण झोप न होण्याचे काय कारण असेल बरे.   भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात २४ व्या श्लोकात असे म्हणले आहे की, एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशन भारत / सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयीत्वार्थोत्तम//  येथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गुडाकेश म्हणतात, गुडाकेश म्हणजेच ज्याने निद्रा आणि  अज्ञान ह्यावर विजय मिळवलेला आहे. अर्जुनाने निद्रेवर विजय मिळवला होता. जो आपल्या निद्रेवर विजय मिळवतो तो जग जिंकू शकतो. म्हणजेच पुरेशी आणि समाधानकारक झोप घेणे आवश्यकच  आहे. तुम्हाला झोप येत नाही, शांत निवांत आणि चटकन झोप येत नाही, किंवा मग तुमचे तुमच्या झोपेवर नियंत्रण नाही का ? तर निश्चितच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. मी माझ्या ह्या ब्लॉगला दोन भागात विभाजित केले आहे  हा ब्लॉगचा पहिला भाग आहे.  तुम्हाला चांगला पर्फोर्मंस दाखवायचा असेल तर दररोजची किमान ८ ते ९ तास झोप घ...

तुमच्या ध्येयाची निश्चित योजना आहे का ?

इमेज
जगातील प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही ध्येय असतेच असते. फक्त फरक इतकाच असतो की, ते ध्येय मोघम असते, अस्पष्ट असते, अनिश्चित असते.  तुमच्यासमोर एक निश्चित ध्येय आहे का ? तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी तुम्ही काही निश्चित योजना तयार केली आहे का ?   ऋग्वेदात असे म्हणले आहे  की, "ज्यावेळी तुम्ही तुमच्या मनाला, हृदयाला आणि तुमच्यातील कणखर विश्वासाला एक विशिष्ट दिशा देता. तेव्हा तुम्ही अशक्यप्राय गोष्टी करून दाखवत असता. " आजपर्यंत जगात अनेकांनी अनेक अशक्यप्राय गोष्टी करून दाखवल्या आहेत.  तुम्ही जर तुमच्या ध्येयासाठी अशी काही निश्चित योजना तयार केलीच नसेल तर, काहीही घाबरू नका. ह्या दोन प्रश्नांची उत्तरे  तुम्हाला  माझ्या  हया  ब्लॉगमध्ये मिळतील. त्यासाठी तुम्हाला माझा हा ब्लॉग पूर्ण वाचावा लागेल.  नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे, येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे. प्रत्येकामध्ये काही ना काही बुद्धिमत्ता, क्षमता, कलात्मकता असतेच असते. राईट बंधूंनी माणसापेक्षा वजनाने जड असणारी वस्तू  हवेत उडवायच...